श्री रामरक्षा

।। श्री रामरक्षा स्तोत्र ।। श्रीगणेशाय नम:।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य। बुधकौशिकऋषि:। श्रीसितारामचन्द्रो देवता। अनुष्टुप् छन्द:। सीता शक्ति:। श्रीमद्धनुमान कीलकम्। श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोग:। अथ ध्यानम्।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं। पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्। वामाकारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरादाभं। नानालकारदीप्तं दधतमुरूजटामण्डनं रामचन्द्रम्।। इति ध्यानम्।
चरित्रं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्। एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्।।1।।
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्। जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम्।।2।।
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम्। स्वलीलया जगत्त्रातु माविर्भूतमजं विभूम्।।3।।
रामरक्षां पठेत् प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम्। शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज:।।4।।
कौसल्येयो द्दशौ पातु विश्वामित्रfप्रय: श्रुति। घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल:।।5।।
जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवन्दित:। स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्रेशकार्मुक:।।6।।
करौ सीतापति: पातु ह्दयं जामदग्न्यजित्। मध्यं पातु खरंध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय:।।7।।
सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु:। ऊरू रघूत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत्।।8।।
जानुनी सेतुकृत् पातु जघे दशमुखान्तक:। पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोखिलं वपु:।।9।।
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत्। स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्।।10।।
पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिण: न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि:।।11।।
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्। नरो न लिप्यते पापैर् भुाक्तिं मुक्तिं च विन्दति।।12।।
जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्राभिरक्षितम्। य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय:।।13।।
वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्। अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंगलम्।।14।।
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:। तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक:।।15।।
आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्। अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु:।।16।।
तरूणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ। पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ।।17।।
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ। पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ।।18।।
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्। रक्ष: कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ।।19।।
आत्तसज्यधनुषाविषुस्पृशावक्षया शुगनिषुगसंगिनौ। रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत: पथि सदैव गच्छताम्।।20।।
संनद्ध: कवची खड्गी चापबाणधरो युवा। गच्छन् मनोरथो स्माकं राम: पातु सलक्ष्मण:।।21।।
रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली। काकुत्स्थ: पुरूष: पूर्ण: कौसल्येयो रघूत्तम:।।22।।
वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरूषोत्तम: जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेयपराक्रम:।।23।।
इत्येतानि जपन् नित्यं मद्क्त: श्रद्धयान्तित:। अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशय:।।24।।
रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर:।।25।।
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं। काकुत्स्थं करूणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं। वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्।।26।।
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:।।27।।
श्रीराम राम रघुनन्दन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम।।28।।
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि। श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये।।29।।
माता रामो मत्पिता रामचन्द्र:। स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र:।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने।।30।।
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा। पुरतो मारूतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्।।31।।
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्। कारूण्यरूपं करूणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये।।32।।
मनोजवं मारूततुल्यवेगं जितेद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।।33।।
कूंजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् आरूह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्।।34।।
आपादामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्। लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्।।35।।
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्। तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्।।36।।
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं। रामे चित्तलय: सदा भवतु भो राम मामुद्धर।।37।।
रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने।।38।।
इतिश्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्।

।। श्रीसितारामचन्द्रार्पणमस्तु।।
सुसंस्कृत कुटुंबातून, घराघरातून म्हटले जाणारे एक चिरपरिचित स्तोत्र अर्थात श्री रामरक्षा स्तोत्र जे मागील पिढीतील व्यक्तींना तोंड पाठ होते. किंबहुना स्तोत्र तोंडपाठ करणे हा त्याकाळी संस्काराचा एक भाग होता. परंतु आज संस्कृत भाषेशी असलेला संबंध कमी कमी होत आहेत. अगदी ब्राम्हण कुटुंबातून सुध्दा संस्कृत भाषा नष्ट होत चालली आहे. राम हा शब्द रम-रमणे-आनंद घेणे या धातूपासून सिध्द होतो.
रमते मन: अस्मित म्हणजे ज्याचे ठायी मन रमते तो राम। रमयति इति राम: अर्थात आनंद देतो तो राम।
प्रभूराम व श्रीकृष्ण नावांची जादू-मोहिनी इतकी प्रचंड आहे की राम-कृष्ण या नावातील रहस्यार्थ नाही समजला तरी ती नावे जिभेवर सारखी खेळत राहतात. श्रीराम हा एक महामंत्रच आहे. याला तारकब्रम्ह म्हणतात. याच्या जपाने मानव सर्व पापांतून मुक्त होतो. राम-राम या नामानेच वाल्या, वाल्मिकी महर्षी झाला. रामरक्षा अर्थात रामाने केलेली रक्षा म्हणजेच संरक्षण असा अर्थ प्राप्त होतो. थोडक्यात रामनामाने अभिमंत्रित केलेली रक्षा (भस्म) हेच कवच असं म्हटलं जातं. रामरक्षा स्तोत्रही आहे आणि मंत्रही आहे. स्तोत्रांमध्ये स्तुती किंवा गुणगान असते म्हणूनच स्तोत्र हे स्तुतीवाचक काव्य असते.

कविवर्य मोरोपंत म्हणतात: स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची।
देव-देवतांविषयी स्तुतीकाव्यांनाच स्तोत्र म्हणण्याची प्रथा आहे. स्तोत्राने, मंत्राने, कवचाने मन:सामर्थ्य वाढते हे निर्विवाद सत्य आहे. बुधकौशिक ऋषींना श्रीशंकरानी ते निद्रेत असताना रामरक्षा सांगितली. सकाळी उठल्याबरोबर बुधकौशिकांनी नेमकी तशीच ती लिहून काढली. असे स्वप्नात ऐकलेले दुसऱ्या दिवशी सकाळी लिहिता येईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या चिकित्सक बुध्दीला जरूर पडेल. यात एक समजावून घेण्याचा भाग असा की, अध्यात्मात स्वप्नदर्शन, स्वप्नादेश यांना अत्यंत महत्व आहे. एखाद्या विषयाचं सतत चिंतन, निदिध्यास करीत राहिल्यास त्याचा अंतर्मनावर खोल ठसा उमटत असतो. त्यातून स्मरणशक्ती व स्फूर्ती यांच्या संयोगाने, निद्रेतील प्रसंग बुधकौशिक सारख्या तपस्वी ऋषींना जागृतावस्थेत सुध्दा तशा पूनर्लिखित करता आल्या असाव्यात. रामरक्षा स्तोत्राच्या नित्य पठणाने बुध्दी सतत गतिमान ठेवली जाते. मातृवात्सल्य वाढत जाते. कर्णेद्रियांचा उपयोग ज्ञानसाधनेसाठी केला जातो. पितृपरंपरेने आलेली कर्तव्ये निष्ठेने पार पाडली जातात. जो जो भक्त जे जे मनात इच्छितो, ते ते प्रभू रामचंद्र पूर्ण करतात. मारूतीराय आपल्या भक्तीनं, गुरूसेवेनं रामाचे झाले. म्हणूनच श्री समर्थ

रामदास स्वामी म्हणतात. नृपेक्षी कदा राम दासाभिमानी
वैदिक परंपरेनुसार वेदातील मंत्र इतके प्रभावी आहेत. की त्या मंत्राच्या उच्चारण्याने, पठणाने अग्नीद्वारा आहुती दिली असता देवतांना मंत्र करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात.
स्तोत्र पठणाने वाचा शुध्द होऊन नियमितपणाची आवड निर्माण होऊन मनावर चांगले संस्कार होतात. दर दिवशी पठण केल्यास अधिक लाभदायक ठरतात.
स्तोत्र मंत्र पठणातून शक्ती कशी प्राप्त होते. त्यासंबंधी एक प्रसिध्द श्लोक आहे.
मंत्रे, तीर्थे, द्विजे, देवे, दैवज्ञे भैषगे, गुरौ। यादृशी भावना यस्य सिध्दिर्भवती तादृशी।।
मंत्र, तीर्थे (काशी, प्रयाग आदी) ब्राह्मण, देवता, ज्योतिष, औषध आणि गुरू (पारमार्थिक) या संबंधी जशी भावना जपकर्त्याची असते. त्याप्रमाणे त्याला यश प्राप्ती होते. रामरक्षा स्तोत्र हे सायंकाळी हाती भस्म घेऊन देवासमोर (प्रतिमासंनिधौ) म्हणण्याची फार जुनी रीत आहे. स्तोत्र पठण झाल्यावर त्या भस्माचा थोडा अंश आपल्या जीभेवर ठेवावा. थोडे आपल्या कपाळावर लावावे. घरातील चारी दिशांना विखरून टाकावे व बाकी इतरांना द्यावे.
पंच ज्ञानेद्रिये व पंच कर्मेद्रियांवर उपासनेने, स्तोत्र मंत्र पठणाने विजय मिळविता येतो. अर्थात त्यांच्यावर ताबा ठेवता येतो. त्यांना वश करता येते. परंतु अकरावे इंद्रिय मन यावर कसा विजय मिळवणार? मन हे चपळ! आवरू न शकणारे, त्याची गती प्रचंड! म्हणूनच कायेचा म्हणजे फक्त शरीराचा विचार करणाऱ्याला मन कळत नाही.

तुकाराम महाराजांचा यावर एक सुंदर अभंग आहे : आधी मन मुंडा। मग कशास मुंडीता तुंडा? अगोदर मन सुशोभित करा. मग तोंड सुशोभित (मुंडित) करण्याची काय गरज आहे?
मन हे चंचल आहे. त्याला कोंडून ठेवणे म्हणजे वाऱ्याला कोंडण्यासारखे आहे. रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांची कृपा प्राप्त होण्यासाठी आर्ततेने म्हणतात :
चपळपणा मनाचे मोडता मोडवेना। रघुपती मति माझी जोडता जोडवेणा।। रघुपती मति माझी आपुलिशी करावी। सकल त्यजुनी भावे कास तुझी धरावी ।।

मनाचे अद्भुत चांचल्य ही त्याची मोठी शक्ती आहे. यासाठी प्रथम आपल्या जीभेला वळण लावले पाहिजे. तिला रामनामात गुंतवून ठेवले तर मनही आपल्या आटोक्यात येते. असा भक्तांचा दृढ विश्वास! जीभेला सतत उच्चारलेल्या रामनामाने नामाच्या गतीला दिशा प्राप्त होऊन मन रामनाम ह्या दिशेनेच मार्ग क्रमू लागते. त्यात गुंतून राहते. म्हणूनच रामरक्षा मध्ये राघवाने मनाचे रक्षण करावे अशी प्रार्थना आहे. राघव याचा अर्थ जो रघुकुलात जन्मला इति राघव. रघु हा धातू गतिवाचक आहे. राघव शब्दाने गति व मति (बुध्दी) या दोघांचाही निर्देश होतो. गति व मति यांचे उगमस्थान मन हे आहे. म्हणूनच बुधकौशिक ऋषी म्हणतात, राघवाने मनाचं रक्षण करावं. एकदा मनाला गती प्राप्त होऊन मार्ग (गती) मिळाली की, मन राममय होऊन प्रभू रामचंद्राच्या कृपेने योग्य मार्गाने, योग्य गतीने आत्मसाक्षात्काराकडे धावू लागले की, जीवनात अन्य असे काही उरणारच नाही. एका अपार आनंदाशिवाय अन्य काही उद्भवणार नाही. मग दु:खाची वार्ता तरी कशी शिल्लक राहिल.